Friday, January 16, 2026

नव्वदी पार व्यक्तींचा सन्मान!


         

राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई गेली बारा वर्षे  ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करीत आले आहे. हे संमेलन दरवर्षी कोकणातल्या वेगळ्या खेड्यामध्ये केले जाते. ग्रामीण मराठी साहित्य संमेलन म्हटल्यानंतर त्याचा संदर्भ मराठी साहित्याशी लावणे योग्यच आहे परंतु केली पंच्याहतर वर्ष राजापूर लांजा तालुक्यातील खेड्यांचा विकास साधण्यासाठी कार्यरत असलेला संघ केवळ मराठी साहित्याचा जागर म्हणून हे संमेलन आखत नाही तर हे संमेलन सामाजिक प्रबोधनाचे व्यासपीठ बनावे हा त्याचा उद्देश आहे.

          इथला रोजगाराचा प्रश्न अत्यंत गंभीर असेल स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा कोकणातल्या सर्व काळातील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला नाही आणि म्हणून इथला शिकला सोडलेला करून हाताला काम मिळावं म्हणून मुंबई पुण्यातील वाट घरे लागला. जो बाहेर गेला तो तिथे स्थायिक झाला आणि गावाकडचा मुलांचा जन्म जर घातला. त्याचा परिणाम शाळांच्या पटावरती होऊन शाळा बंद पडू लागल्या दुकानदार त्याचा व्यापार होईनासा झाल्याने दुकान बंद करून शहरात आला आज केवळ सणासुदीला गाव माणसांनी फुलून येतोय अन्यथा गावातली घर बंद पडलेली आहेत शेतजमीन रान माजवित आहे. त्याही परिस्थितीत म्हणून ज्या मुली गावाकडच्या मुलाबरोबर लग्न करून गावाकडे संसार थाटत आहेत हा एक आशेचा किरण आहे त्या मुलींच्या धाडसाचे कौतुक करावे म्हणून ग्रामीण साहित्य संमेलनाच्या मंचावरती त्यांना बोलावून त्यांना आहेर दिला जातो.

         शेकडो वर्ष कोकणातल्या शेतकऱ्यांनी जपून ठेवलेली झाडे ज्यामुळे कोकणच्या निसर्ग सौंदर्यात वेगळीच भर पडलेली होती मात्र गेल्या काही वर्षात इथला शेतकरी पैशाच्या मोहा पायी झाडे विकू लागला. त्यामुळे डोंगर बोडके झाले. त्याचा परिणाम अवेळी पाऊस पडण्यावर झाला. जमीनी झाडांचं मूळ सोडून सुटू लागल्या आणि पावसाच्या पाण्याबरोबर या नदीतून वाहू लागल्या. नदीत आज जमलेले दगड गोटे हे झाडे तोडण्याचे परिणाम आहेत. एकेकाळच्या बारमाही पाणी भरून  वाहणाऱ्या नद्या आज वाळूच्या राशी मिरवत आहेत. त्यातच ग्रामस्थ आपल्या घरातलं किडूक मिडूक, टाकाऊ वस्तु कचराकुंडी समजून नदीत फेकत आहेत.आयुष्यभर स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवणाऱ्या या नद्यांची आजची अवस्था पाहिली आपल्याच डोळ्यांत वेदनेची नदी वाहते. हे चित्र बदलावे म्हणून नदीला पवित्र स्थानी आणून तिची भक्ती भावाने पूजा करण्याचा नवीन उपक्रम या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सुरू केला गेला.संमेलनाच्या पूर्वसंध्येला गावातील आबालवृद्धांना एकत्र करून गाव कुसाला वाहणाऱ्या नदीच्या काठावर नदीजल पूजन करुन श्रद्धेच्या कुरवंड्या वाहिल्या जातात.सगळ्यांचे हात कृतज्ञतेने जोडले जातात आणि हृदयापासून शब्द निघतात. "आजपासून मी नदीच्या पात्रात कचरा टाकणार नाही."

        " लग्नानंतर मुलांचे आईवडील सोबत राहणार असतील तर मला हे स्थळ मान्य नाही." लग्नाच्या बाजारात आजकालच्या मुलींचे असे वक्तव्य येऊ लागल्यानंतर उद्याच्या मुलांच्या आई-वडिलांनी उतार वयात कोणाकडे बघायचे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. काळ बदलतो काळाप्रमाणे आवश्यक असलेला विकास होतो मात्र मनुष्य जीवनाचे जगणे या संस्कारावर आधारित आहे ते संस्कार जर धुळीला मिळाले तर उद्या कोणत्याही कुटुंबात वृद्ध किंवा आजारी माणसांचं स्थान असणार नाही तर त्यांच्यासाठी प्रत्येक गावात, वाडीवर वृद्धाश्रम अनाथाश्रम उभारावे लागतील. घरातील आजी आजोबा हे पुढच्या पिढीचे संस्कारांचा स्त्रोत असतो. तूच जर नष्ट झाला सामाजिक बांधिलकी हा शब्दही नष्ट होईल आणि केवळ स्वतःपुरता जगणं हेच शिल्लक राहील. या जगण्यात सामूहिक जीवनातला निखळ आनंद असणार नाही.

       (श्रीमती सुमित्रा पुंडलिक पेडणेकर, वय ९६)

           संघाने ९० पार केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याचे ठरवले. खरं पाहिलं तर तो सन्मान त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांचा असतो. एखादी व्यक्ती तिची शरीर रचना सुदृढ असते तिच्या जेवणा खाण्याच्या काही आदर्श पद्धती असतात मात्र ही व्यक्ती जेव्हा दुसऱ्या वरती अवलंबून राहते त्यावेळेला त्या व्यक्तीला तिच्या जेवण्या खाण्याच्या आवडी पुरवणे, वेळेवर आणि सकस आहार देणे त्यांचे मानसिक स्वास्थ्य सांभाळणे

          ( श्री.शंकर शिवाजी आयरे ,वय ९२ )

 त्यांच्या आजारात योग्य व वेळीच उपचार करणे आणि विशेषता त्यांच्या जगण्याला पूरक ठरणारा आनंद हा कुटुंबात मिळेल याची काळजी घेणे या सगळ्या गोष्टी त्यांच्या कुटुंबावर अवलंबून असतात. ज्या कुटुंबातून हे सगळं मिळतं त्यावेळेला ती व्यक्ती नव्वदी पार करते किंवा शंभरीलाही स्पर्श करून जाते. आणि म्हणूनच ज्या समाजात अशी कुटुंब असतात तो समाज निरोगी आनंदी असतो. हे समाजापुढे मांडण्यासाठी आणि भविष्यातील अनाथाश्रमांच्या, वृद्धाश्रमांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी संघाने केलेला हा एक उपक्रम आहे.अशा समाज प्रबोधनात्मक उपक्रमांना अक्षरयात्रेत स्थान मिळाल्याने त्या उपक्रमांचे ही कौतुक होते आहे.

     ( ह.भ.प.श्री.सखारामबुवा दामोदर आयरे वय ९६ )

              रिंगणे गावी होणाऱ्या ११व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रिंगणे,कोंडगे, कुरंग, झर्ये, व्हेळ, आरगाव या गावातील सर्व ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.दि.३०जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे आपणही अक्षर वारकरी होऊन सहभागी होऊ या !

सुभाष लाड                                                  अध्यक्ष.                                                         राजापूर- लांजा तालुका नागरिक संघ मुंबई

.          ( श्री.अनाजी भिकाजी यद्रुक वय ९५ )

.                 (श्रीम.मालती सयाजी आयरे )

आपण आपली जाहिरात स्मरणिकेत देऊ शकता!



आपल्या सौजन्याने एखादा उपक्रम पुढे जाऊ शकतो.



        

           

No comments:

Post a Comment