Friday, May 9, 2025

कोकणात पुन्हा एकदा ' वीर शिवाजी '       

कोकणात पुन्हा एकदा ' वीर शिवाजी '

         दोन वर्षांपासून राजापूर आणि लांजा या तालुक्यातील दमदार खेळ करणाऱ्या मुंबईतील महालक्ष्मी कला मंचला पुन्हा एकदा 'वीर शिवाजी ' नाटक सादर करण्याची संधी मिळाली आहे. लांजातील आसगे गावात तर वीर शिवाजी आणि वीर रत्न बाजीप्रभू या दोन्ही नाटकांचे खेळ आयोजित करण्यात आले आहेत.

          आदर्श समाज रचना आणि आदर्श नागरिक घडवायचे असल्यास रामायण, महाभारत आणि शिवशाहीचा अभ्यास होणार गरजेचे आहे. राम कृष्णांच्या कथा ऐकून छत्रपती शिवाजी राजे घडले. छत्रपतींचा इतिहास ऐकून राणी लक्ष्मीबाई सारख्या वीरांगना रणांगणात शत्रूशी लढता लढता अमर झाल्या.अशाच अनेक नररत्नांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हसत हसत फाशीचा दोर गळ्यात अडकवला, कोणी छाती वरती गोळ्या झेलल्या तर कुणी कारावासातच अंतिम श्वास घेतला. आपल्या पुढच्या पिढीचा भविष्य चांगला घडवायचा असल्यास आपला जाज्वल्य भूतकाळ त्यांच्यापुढे मांडणे गरजेचे आहे.


          शिवतेजाने भारावलेली कोकणातली तरुण चाकरमानी कलाकार मंडळी आपला मराठ्यांचा इतिहास लोकांच्या समोर मांडण्यासाठी शिवशाहीतील विविध विषयांवरची नाटके सादर करीत असतात. या हौशी कलाकारांनी केलेली नाटके व्यवसायिक नाटकाच्या तोडीस तोड असतात त्यामुळेच गोव्यामध्ये या नाटकाचे सलग आठ खेळ तिथल्या खेडोपाड्यामध्ये आयोजित केले गेले.

यावर्षी १०मे २०२५ रोजी रात्री लांजातील वेरळ गावात वीर शिवाजी हे नाटक आहे. ११मे ला रात्री ८ वा.आसगे गावी वीर रत्न बाजीप्रभू ,१२मे रात्री ८ वा रत्नागिरीतील वीर सावरकर नाट्यगृहामध्ये वीर शिवाजी,तर १३ मे रोजी रात्री ८ वा. वीर शिवाजी या नाटकाचा प्रयोग आसगे गावातच आहे.

आपण आपल्या कुटुंबासमवेत या नाटकांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती.

सुभाष लाड

९८६९१०५७३४

No comments:

Post a Comment